केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवाय, राज्य सरकारवर केंद्रकाडून केल्या जाणाऱ्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
“महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजपा सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
तसेच, “महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे.” असा सल्ला देखील नाना पटोलेंनी दिला आहे.
No comments:
Post a Comment